सुविचार हे प्रत्येकाने रोज वाचले पाहिजे कारण सुविचारामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि तुमच्या दिवसाची सुरवात चांगली होते.

#Success marathi suvichar | Success quotes in marathi
- मनुष्य किती मोठा झाला यापेक्षा तो कसा मोठा झाला त्याला महत्त्व आहे.
मनुष्य वयाने, पैशाने,कीर्तीने,पदाने मोठा होतो. परंतु मोठे होताना तो कोणता मार्ग अवलंबतो हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. 100 वर्षाचे आयुष्य स्वतःसाठीच जगला तर त्या जगण्याला काय महत्व? वाईट मार्गाने मिळविलेल्या पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा कष्टाने मिळविलेल्या पैशाची श्रीमंती शोभून दिसते. Inspirational Success Marathi Suvichar :
- उत्तम नियोजन ही यशाची हमी.
कोणत्याही कार्याचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा केव्हा कोणी, कुठली गोष्ट करावयाची याविषयी अनिश्चितता निर्माण होते. त्यामुळे किती वेळात ते काम पूर्ण करावयाचे आहे, कोणकोणती कामे करावयाची आहेत, कोणती व्यक्ति कोणतं काम चांगल्या रीतीने पूर्ण करू शकते या सर्वाचा विचार करून ते ठरविणे म्हणजेच नियोजन. जेवढे चांगले नियोजन तेवढी यश मिळण्याची खात्री. Inspirational Success Marathi Suvichar
- पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते तर ज्ञान तुमचे रक्षण करते.
चोर पैसा चोरू शकतो, नातलगांमध्ये त्यासाठी भांडण होते, राजा त्याच्यासाठी कर घेतो. पैशाचे सर्वांपासून जपून ठेवून रक्षण करावे लागते. परंतु ज्ञानाची कोणीही चोरी करू शकत नाही. त्याच्या वटणीसाठी भांडण होत नाही. तर याच ज्ञानामुळे पैसा,यश,कीर्ती, मानसन्मान प्राप्त होतो. म्हणजेच ज्ञान आपले रक्षण करते. Inspirational Success Marathi Suvichar
- अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. मात्र तो मोबदला जबर घेतो.
माणूस पुस्तकीज्ञान मिळवत आपली विद्वत्ता वाढवत असतो. त्याचबरोबर व्यवहारातील ज्ञान त्याला प्रत्यक्ष अनुभवातून मिळत असते. प्रत्यक्ष जिवणातील सगेसोयरे,मित्रमंडळ, शेजारी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी भेटणारी माणसे यांच्याकडून येणार्यात चांगल्या वाईट अनुभवातून माणूस शिकत असतो. हे अनुभवच शिक्षक असतात. परंतु काही अनुभव आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान अशा रीतीने करतात की ते नुकसान भरून काढणे कठिण असते. हे नुकसान म्हणजे अनुभवरूपी गुरूला दिलेली गुरूदक्षिणा! Inspirational Success Marathi Suvichar
#Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
- जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकता नव्हे, तो परमार्थही नव्हे, तर तो नेभळटपणा आहे.
दुसऱ्यावर अन्याय करणे, जुलूम करणे म्हणजे चुकीचे आहे. परंतु अन्याय सहन करणे ही मोठी चूक आहे. काही जणांना वाटते की अन्याय सहन करणे म्हणजे ती आपली सहनशीलता आहे किंवा ती व्यक्ती पारमार्थिक असल्याचे लक्षण आहे. परंतु असे काही नसते.कारण जुलूम सहन करताना मनाला त्रास होत असतो. परंतु त्याला विरोध करण्याएवढे शारीरिक व मानसिक बळ नसेल तर माणूस त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. हा त्याचा दुर्बळपणा आहे, नेभळटपणा आहे. कारण मनातून त्याला त्याचा राग येत असतो.
- उच्चारांवरून विद्वत्ता,आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरुन माणसाचे शील समजते. Inspirational Success Marathi Suvichar
माणसाच्या आचरणातून, त्याच्या बोलण्यावरून, त्याचा विचार करण्याच्या पद्धतीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व समजते. माणूस काय बोलतो, यामध्ये त्याची हुशारी कळते. तो कसे बोलतो यावरून तो किती विनयशील आहे हे कळते. तो प्रत्यक्ष कृती काय करतो, त्याच्या बोलल्यामध्ये व वागण्यामध्ये एकरूपता आहे की नाही यामधून त्याचे चारित्र्य समजते.

- काहीही निर्माण होत नाही, मरत नाही, घडत ते फक्त रूपांतर
जेव्हा एखादी वस्तू, व्यक्ति आपल्याला दिसते किंवा इंद्रियांना जाणवते तेव्हा आपण तिचे अस्तित्व मान्य करतो परंतु तिचे अस्तित्व इंद्रियांना जाणवत नाही तेव्हा आपण तिचे अस्तित्व नाकारतो. उदा. गाई-.म्हशीची धार काढण्यापूर्वीच दूध असते पण ते आपल्याला दिसत नाही. दुधाचे दही, दह्याचे ताक,ताकातील लोणी, लोण्याचे तूप, तुपाचे सेवन करून ते शरीरातील विविध धातूंमध्ये रूपांतरित होते. ते निर्माण होत नाही.नष्टही होत नाही. हाच नियम सर्व प्राणिमात्रांसाठी,विश्वासाठीदेखील आहे.
- ‘माझे’ ‘माझे’ भ्रांतीचे सर्व ओझे.
माणूस माझेपण मध्ये गुंतून पडतो.घरदार,कुटुंब , ऐश्वर्य, यश, कीर्ती या सर्वाला तो ‘माझे’ समजतो. त्याच्यामुळे तो सुखी होतो,दुःखी होतो. त्याच्या मिळविण्यामध्ये,विचारामध्ये संपूर्ण आयुष्य घालवितो. परंतु मृत्यूनंतर हे सर्व इथेच ठेवून मोकळ्या हातानेच जावे लागते. हे माहिती असूनही तो आयुष्यभर माझेपणाचे ओझे सांभाळतो. भासाला सत्य शाश्वत समजतो.
#Good Thought in Marathi | चांगले विचार मराठी
- अर्धवट ज्ञानाने मनुष्य अधिक बडबड करतो. Inspirational Success Marathi Suvichar
खरा ज्ञान, खरा विद्वान मोजक्याच शब्दांचा वापर करतो. तो मितभाषी असतो. विनाकारण बोलण्यामध्ये तो आपली ऊर्जा वाया घालवत नाही. ज्याच्याकडे कमी असते त्याला त्याचे प्रदर्शन करण्याची हौस असते. खिशामध्ये असणारी चिल्लर खूप आवाज करते परंतु लाख रुपयांच्या नोटा अजिबात आवाज करीत नाहीत. अर्धवट भरलेली घागर ‘डुबुक डुबुक’ असा आवाज करते,पूर्ण भरलेली घागर आवाज करीत नाही. Inspirational Success Marathi Suvichar
- केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे.
प्रयत्न केल्याने अशक्य असणार्यांना गोष्टी शक्य होतात. परंतु प्रयत्न न केल्यास मिळण्यास अत्यंत सोप्या असणार्या गोष्टीदेखील हातातून निसटून जातात. त्यामुळे कोणतेही ध्येय अशक्य नाही फक्त त्याच्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी मात्र असली पाहिजे. डोंगर चढण्याचे धाडस करू शकत नाही. परंतु जो चढायला सुरुवात करतो तो हळूहळू डोंगरावर जाऊन पोहोचतो.
- भविष्य विचारण्यापेक्षा आत्मविश्वासाने भविष्य घडवावे.
माणसाचे भविष्य हातावरच्या रेघांवर अवलंबून नाही. त्यापेक्षा त्याच हातामधे बळ असते. त्या हातांच्या साहाय्याने कर्तृत्व दाखवावे. आपल्या हातांवर, आपल्या क्षमतांवर,आपल्या कर्तुत्वावर ज्याचा विश्वास असतो, त्याला ज्योतिषाला हातावरच्या रेघा पाहून भविष्य समजून घेण्याची गरज भासत नाही. तोच त्याचे भविष्य घडवितो.
Join marathi blooging course https://courseinmarathi.com/
- मोहाची पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.
आपल्याला न मिळालेली वस्तू, पैसा ऐश्वर्य प्राप्त व्हावे वाटणे म्हणजे मोह.मोह होणे आणि त्या मोहाच्या आहारी जाणे यामध्ये फरक आहे.
जेव्हा माणूस मोहाच्या आहारी जातो तेव्हा तो ते मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार होतो. तो चांगले-वाईट, चूक बरोबर याचा विचार करीत नाही. कोणत्याही भल्याबुर्या मार्गाने आपल्याला जे हवे आहे ते मिळवायचे एवढेच तो ठरवितो. त्यामुळे हातून पापकर्म घडते. Inspirational Success Marathi Suvichar
- संधीची वाट पाहू नका, ती स्वतःच शोधा.
आपल्या आयुष्यात आपणास जे यश मिळवायचे आहे, ध्येय प्राप्त करावयाचे आहे त्यासाठी कोणीतरी आपल्याला त्यासाठी संधी उपलब्ध करून देईल किंवा काळच आपल्याला संधी देईल असे रामभरोसे न राहता स्वतःहातापाय हलविले पाहिजेच. प्रयत्न केले पाहिजेत. स्वतःच स्वतःसाठी संधी निर्माण केली पाहिजे.
#Inspirational Success Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
- बुद्धी कुंठित होते तेथे श्रद्धा सुरू होते.
माणसाच्या जीवनात बुध्दी व श्रद्धा दोन्हीही महत्त्वाच्या आहे. कधी कधी बुध्दी चालणे बंद होते, काय केले पाहिजे समजत नाही अशावेळी बुद्धिवर श्रद्धा असू द्यावी. ही श्रद्धा काम करते अन् बुध्दीला चालना देते.
- भाषा हे समाजाचे प्रतिबिंब आहे.
भाषा हे वैचारिक देवाणघेवाणीचे साधन आहे. समाजाचे अनुभव,विचार, गरज बदलत असते. त्यानुसार वापरले जाणारे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, बदलतात. भाषेमध्ये अनेक नवीन शब्दाची भर पडते. जुन्या वापरातील शब्दाचे प्राबल्य कमी होत जाते. आदिमानवाच्या एकमेकांशी संपर्काची भाषा आणि आधुनिक युगातील संपर्काची भाषा यामध्ये खूप फरक आहे. हा बदल सामाजिक बदलाबरोबरच होत गेलेला आहे. म्हणजे भाषेवरून तो समाज कसा आहे हे समजते. Inspirational Success Marathi Suvichar :

- शब्द हा विचाराचा पुत्र आहे.
माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. तो विचार करत असतो. आपले विचार व्यक्त करण्यासाठी पूर्वी तो देहबोली वापरत असे. परंतु त्या माध्यमातून त्याचे सर्व विचार व्यक्त होऊ शकत नव्हते. या गरजेतून तोंडातून ध्वनी,ध्वनितुन अक्षर , अक्षरांतून वर्ण,वर्णातून शब्द व शब्दांचे वाक्य, वाक्यांची भाषा त्याने तयार केली. विचार व्यक्त करण्याच्या गरजेतून शब्द निर्माण केले जातात व नवनवीन शब्दांनी भाषा समृद्ध होते. Inspirational Success Marathi Suvichar :
- परोपकार म्हणजे पुण्य तर परपीडा म्हणजे पाप.
पापपुण्याची व्याख्या अगदी सोपी आहे. आपल्याला दुसर्याला मदत करता आली नाही, तर करू नये परंतु किमान दुसर्याला त्रास होईल असे वागू तरी नये. कारण दुसर्याला मदत करणे , दुसर्याच्या कल्याणासाठी झटणे हाच परोपकार आहे. ते पुण्यकर्म आहे.परंतु दुसर्याला आपल्या वर्तनामुळे त्रास होईल असे वागणे म्हणजे पापकर्म आहे.
- दुष्टावर केलेले उपकार हेसुद्धा अपकारच ठरतात. Inspirational Success Marathi Suvichar
जसे म्हटले जाते की सत्पात्री असावे.त्याचप्रमाणे उपकारदेखील सज्जनांना करावे, दुष्टांना नाही. दुष्टांना कितीही मदत केली तरी ती व्यर्थच असते. जसे कारल्याच्या वेलाला पाणी घाला, अमृत घाला त्याला लागणारी कारली ही कडूच असतात. अमृत घडणार्यालासुद्धा ती कडू फळेच देतात.
also read
- ज्ञान दिल्यामुळे वाढते, साठविल्यामुळे नाही.
आपल्याकडे असणारा कोणताही साठा हा दिल्यामुळे कमी होतो, साठविल्यामूळे वाढतो. परंतु ज्ञानाचा साठा हा या सर्वांपेक्षा वेगळा आहे. असामान्य आहे. ज्ञानी माणूस दुसर्याला ज्ञान देतो. तेव्हा ते जाणणाराचि संख्या वाढते. त्याचबरोबर ज्ञान देणारा, ज्ञान देत असताना विचार करतो, इतरांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न करतो यामध्ये त्याचे स्वतःचे मन शांत व ज्ञान दृढ होते अन् वाढतेदेखील म्हणजेच दिल्यामुळे वाढते. Inspirational Success Marathi Suvichar
- उत्तम आरोग्य ही मोठी संपत्ती आहे.
माणूस सर्व श्रीमंती ऐश्वर्यात मोजतो, पैशात मोजतो. परंतु पैशापेक्षा आपले सुदृढ आरोग्य महत्वाचे आहे. माणूस पैसा मिळवायचा मागे लागतो व आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पैशाने ऐषोआराम मिळविता येतो, पण आरोग्य मिळविता येत नाही. श्रीमंतांकडे भरपूर संपत्ती असते परंतु तिचा उपयोग घेण्यासाठी तंदुरुस्त आरोग्य मात्र असतेच असे नाही. सर्वत्र आजार पैशाने बरे होतातच असे नाही.